गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन
महाराष्ट्रात सुशासन आणण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि:१८ माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस सुशासन दिन म्हणून पाळण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त गेल्या ४५ दिवसांत घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांना दिली आहे.             

हे निर्णय पुढीलप्रमाणे:-

·        २०१५ हे वर्ष डिजिटल पद्धतीने राज्यातील नागरिकांना कालबद्ध सेवा देणारे वर्ष म्हणून घोषित
·        नागरिकांना ‘सेवेची हमी देणारा कायदा’ अंमलात आणणे सुरु  
-    या प्रस्तावित कायद्यान्वये नागरिकांना कालबद्ध  सेवा मिळणार
-    हा कायदा सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था यांना लागू. कर्तव्यात कसूर केल्यास दंड. तसेच चांगल्या सेवेसाठी प्रोत्साहन.
-    Minimum Government- Maximum Governance चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनावश्यक कार्यपद्धती, नाहरकत प्रमाणपत्रे, परवाने वगळण्याचा निर्णय
·        राज्यातील उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाने आवश्यक परवाने, अनुज्ञप्ती मंजूर करण्याचे दिवस कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत.



·        राज्य सरकारने अनेक पारदर्शी उपक्रम सुरु केले आहेत:
-    ३ लाखावरील खरेदी किंवा कामासाठी ई- निविदा काढणे बंधनकारक
-    १ लाखापेक्षा जास्त किंमतीसाठी ई- लिलाव बंधनकारक
-    म्हाडा तर्फे घर नोंदणी, टेक्सी परवाने यासाठी ऑनलाईन अर्ज
-    राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणार
·        शासनाच्या विविध विभागांची कार्यक्षमता अधिक वाढावी तसेच पारदर्शकता यावी यासाठी आर्थिक तसेच प्रशासकीय अधिकार क्षेत्रीय स्तरावर देऊन निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी करून सुलभता आणण्यात आली आहे.
-    महसूल विभागात तहसीलदार याचे अधिकार नायब तहसीलदार यांना.
-    वन विभागात मुख्य वनसंरक्षक यांचे अधिकार विभागीय वन अधिकारी यांना
-    अन्न व औषध प्रशासनात आयुक्तांना अधिकार
-    नगर भूमापन विभागात अधिकारांचे विकेंद्रीकरण
·        नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचे वार्षिक विवरण भरणे बंधनकारक.          हे विवरण वेबसाईटवर टाकण्यात येईल.
·        शासनाने यापूर्वीची प्रतिज्ञापत्रे देण्याची पद्धत बंद केली असून विविध अर्जांचे नमुने सुलभ केले आणि स्वप्रमाणित कागदपत्रे स्वीकारण्याची पद्धत सुरु केली.
·        राज्य शासनाने मंत्रालय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ई- गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुरु केली असून येणाऱ्या वर्षांमध्ये कार्यालये कागदविरहित करण्यावर भर असेल.
·        ८५ नागरी सेवा केंद्रे ऑनलाईन करण्यात आली असून ती राज्य शासनाच्या ऑनलाईन पोर्टल- महाऑनलाईन वर उपलब्ध आहेत.
·        आपले सरकार हे वेब पोर्टल आणि मोबाईल एप्लिकेशन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु असून धोरण ठरविण्यामध्ये नागरिकांच्या सुचना तसेच तक्रारी देखील स्वीकारण्यात येणार आहेत.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा