सोमवार, ३० जानेवारी, २०१२

संदेश संखे यांनी पुर्ण केली 21 किलोमीटरची मॅराथॉन

हार्दिक अभिनंदन !  त्रिवार अभिनंदन !
श्री. संदेश संखे, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय
(स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅराथॉन स्पर्धा पूर्ण)
मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी श्री. संदेश संखे यांनी दि. 15 जानेवारी 2012 रोजी मुंबईत झालेल्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन 21 किलोमीटरची स्पर्धा 2 तास 36 मिनिटे 44 सेकंद या वेळेत पूर्ण केली. आयोजकांच्यावतीने त्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. श्री. संखे हे उत्साही व मनमिळाऊ कर्मचारी असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सहकाऱ्यांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्यांनी गेला महिनाभर रोज आठ किलोमीटर पळण्याचा सराव केला. श्री. संखे यांचे मन:पुर्वक अभिनंदन.






शनिवार, २८ जानेवारी, २०१२


महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयावरील हल्ल्याचा
मुख्यमंत्र्यांकडून तीव्र निषेध

मुंबई.दि. २८ महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयावर आज दुपारी करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच तोडफोड करणाऱ्या या हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा हक्क सगळ्यांना आहे. वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्याविषयी एखाद्या राजकीय पक्षास आक्षेप असेल तर संपादकांशी बोलून किंवा अन्य लोकशाही मार्गाने त्यांना ती बाजू मांडता येऊन शकते, मात्र महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्राच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात घुसून सामानांची तोडफोड करणे, वृत्तपत्रे जाळणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. विशेषत: मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा आत्मविश्वास ढळला असल्याचे हे लक्षण आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा असे निर्देशही त्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.   

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२


राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण
गेल्या 50 वर्षात राज्याची चौफेर प्रगती : राज्यपाल

    मुंबई दि. 26 : राज्याने गेल्या 50 वर्षात चौफेर प्रगती केली असून आर्थिक विकास, सामाजिक व राजकीय सुधारणा  यात  महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे. देशाच्या सकल विकास उत्पन्नात राज्याचे 50 टक्के योगदान आहे. उद्योग क्षेत्रातही राज्यात देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल               के. शंकरनारायणन् यांनी आज प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात केले.
    प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा आज शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. सकाळी सव्वा नऊ वाजता राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, महापौर श्रद्धा जाधव, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, पोलीस महासंचालक के. सुब्रम्हण्यम्, पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आदींसह लोकप्रतिनिधी, विविध देशांचे राजदूत, लष्करी दल, पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, लोकशाही चौकटीत राहूनही भारतासारखा विकसनशील देश आर्थिक महासत्ता बनू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. राज्याच्या सर्वेकष विकासासाठी लोकशाहीची ही वीण अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
    सामाजिक आणि भौतिक सुविधा तसेच प्रशासन सुधारण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या असून सर्वस्तरावर प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रशासनात सुधारणा होण्याबरोबरच जबाबदारी आणि पारदर्शकता येईल व याचे लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविले जातील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
    महाराष्ट्राने  12 व्या पंचवार्षिक योजनेत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. राज्याचे सकल विकास उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य 11 टक्के प्रस्तावित आहे. ही उद्दिष्ट्ये राज्य नक्कीच साध्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
    नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली असून दहशतवादाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शासनाने पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रे दिली आहेत. मात्र पोलीस यंत्रणेच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याबरोबरच जनतेने जागरुकता दाखविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    राज्यपाल म्हणाले की, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्यात सध्या सुरु आहे. या लोकशाही प्रक्रियेतून स्थानिक स्वराज्य संस्थावरील विश्वास आणि बांधिलकी व्यक्त होते. जनतेने शांततापूर्ण मार्गाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मूल्यांची जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    राज्यपाल यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी वाचून दाखविला.
    यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 8, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 11, मुंबई सशस्त्र पोलीस दल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड (पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल (पुरुष/महिला),  मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सी.कॅडेट कोअर (मुले/मुली),     आर. एस. पी. (मुले/मुली), ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग (चित्ररथ) तसेच कोळी नृत्य, नाशिक जिल्ह्याचे सोंगी मुखवटे नृत्य, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य आणि लावणी आदी पथकांनी भाग घेतला.
    बृहन्मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे 40 मोटर सायकल पथक, नौदलाचे जमिनीवरुन हवेत तसेच जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र, पोलीस दलाची आर.आय.व्ही.वाहन, रक्षक वाहन, मार्क्समॅन वाहन, महारक्षक वाहन, नागरी संरक्षण दलाची  रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन, सेंट जॉन ॲम्बुलन्सची रुग्णवाहिका तसेच मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन व फिरत्या मंचकाची शिडी यांनी देखिल यावेळी झालेल्या संचलनात भाग घेतला.
000


विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते
विधान मंडळाच्या प्रांगणात ध्वजारोहण

   मुंबई, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विधानभवनाच्या प्रांगणात आज सकाळी आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदींसह विधीमंडळाचे सदस्य, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सहसचिव भाऊसाहेब कांबळे, यु. के. चव्हाण आदींसह विधानमंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
    मुख्य सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
000

National Flag Hoisting at Hon. Chief Minister,s residence 'Varsha'.

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




NATIONAL ANTHEM OF INDIA


 The text, though Bengali, is highly sanskritized (written in a literary register called Sadhu bhasa). As quasi-Sanskrit text, it is acceptable in many modern Indic languages, but the pronunciation varies considerably across India. This is primarily because most Indic languages are abugidas in that certain unmarked consonants are assumed to have an inherent vowel, but conventions for this differ among the languages of India. The transcription below reflects the Bengali pronunciation, in both the Bengali script and romanization.
Bengali script
Bengali phonemic transcription
 transliteration
জনগণমন-অধিনায়ক জয় হে.
ভারতভাগ্যবিধাতা
পঞ্জাব সিন্ধু গুজরাট মরাঠা
দ্রাবিড় উৎ‍‌কল বঙ্গ
বিন্ধ্য হিমাচল যমুনা গঙ্গা
উচ্ছল জলধি তরঙ্গ
তব শুভ নামে জাগে
তব শুভ আশিস মাগে
গাহে তব জয়গাথা
জনগণমঙ্গলদায়ক জয় হে
ভারতভাগ্যবিধাতা
জয় হে, জয় হে, জয় হে,
জয় জয় জয়, জয় হে॥
Jônogônomono-odhinaeoko jôeô he
Bharotobhaggobidhata
Pônjabo Shindhu Gujoraṭo Môraṭha
Drabiṛo Utkôlo Bônggo
Bindho Himachôlo Jomuna Gôngga
Uchchhôlo jôlodhi toronggo
Tôbo shubho name jage
Tôbo shubho ashish mage
Gahe tôbo jôeogatha
Jônogônomonggolodaeoko jôeô he
Bharotobhaggobidhata
Jôeo he, jôeo he, jôeo he,
jôeo jôeo jôeo, jôeo he
Jana gaṇa mana adhināyaka jaya he
Bhārata bhāgya vidhātā
Pañjāba Sindhu Gujarāṭa Marāṭhā
Drāviḍa Utkala Vaṅga
Vindhya Himāchala Yamunā Gaṅgā
Ucchala jaladhi taraṅga
Tav śubha nāme jāge
Tav śubha āśiṣa māge
Gāhe taba jaya gāthā
Jana gaṇa maṅgala dāyaka jaya he
Bhārata bhāgya vidhāta
Jaya he, jaya he, jaya he
Jaya jaya jaya, jaya he!
Translation into English
The following translation, attributed to Tagore, is provided by the Government of India's national portal.
Thou art the ruler of the minds of all people,
Dispenser of India's destiny.
Thy name rouses the hearts of Punjab, Sindhu,
Gujarat and Maratha,
Of the Dravida and Orissa and Bengal;
It echoes in the hills of the Vindhyas and Himalayas,
mingles in the music of Jamuna and Ganges and is
chanted by the waves of the Indian Ocean.
They pray for thy blessings and sing thy praise.
The saving of all people waits in thy hand,
Thou dispenser of India's destiny.
 victory forever.

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२


                                राज्य निवडणूक आयोग
                         महाराष्ट्र
       पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
                                       (प्रसिद्धिपत्रक)           दि. 24 जानेवारी 2012


प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या
हस्ते ध्वजारोहण करता येईल
                           -नीला सत्यनारायण

मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांचा आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.   
0-0-0

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

SOME IMPORTANT WEBSITE ADDRESSES
(For your reference)

·         Government of Maharashtra
www.maharashtra.gov.in    
·         Ministry Of Urban Development, GOI
www.urbanindia.nic.in
·         Government Of India, ministry Of Enviornment  & Forest
www.moef.nic.in
·         Ministry Of Enviornment, Government Of Maharashtra
www.envis.maharashtra.gov.in
·         Maharashtra State Road Development Corporation Ltd.(MSRDC)
www.msrdc.org                   
·         The City and Industrial Dev. Corporation of Mah. Ltd.(CIDCO)
www.cidcoindia.com
·         Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
www.midcindia.org
·         Mumbai Rail Vikas Corporation(MRVC)
www.mrvc.indianrail.gov.in
·         Maharashtra Jeevan Pradhikaran(MJP) 
www.mjpmaharashtra.org
·         Vision Mumbai
www.visionmumbai.org
·         The Mumbai Metropolitan Region – Heritage Conservation Society(MMRHCS)
http://mmrhcs.org.in
·         Mumbai Metro One Private Limited
http://www.mumbaimetro1.com/HTML/MMOPL.html
·         Navi Mumbai Muncipal Corporation (NMMC)
www.nmmconline.com
·         Municipal Corporation of Greater Mumbai(MCGM)
www.mcgm.gov.in
·         Thane Mahapalika
www.thanemahapalika.com
·         Kalyan Dombivli Municipal Corporation(KDMC)
www.kdmc.gov.in
·         Kulgaon Badlapur Municipal Council (KBMC)
www.kbmcinfo.com
·         MMR Environment Society
www.mmreis.org.in
·         Mira-Bhayander Municipal Corporation
http://mbmc.gov.in
·         Ulhasnagar Municipal Corporation 
http://www.umc.gov.in:8080/umc/
·         Best Undertaking
http://www.bestundertaking.com 
·         Official Website Of Mumbai City Collectorate
www.mumbaicity.nic.in
·         Official Website Of High Court Of Mumbai
www.bombayhighcourt.nic.in
·         Supreme Court Of India
www.supremecourtofindia.nic.in
·         National Website Of Income Tax Department Of India
www.incometaxindia.gov.in
·         Central Vigilance (CVC)
www.cvc.nic.in
·         Mumbai Police
www.mumbaipolice.org
·         Mumbai Diasaster Management Plan - Dept Of Relief Rehabilitation
www.mdmu.maharashtra.gov.in

 


  राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान
                                                      -नीला सत्यनारायण

मुंबई, दि. 21 : महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या `राष्ट्रीय मतदार दिवसा`निमित्त सप्ताहाभर मतदार जागृती अभियान राबवावे, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियनाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.
विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आणि या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहचवावा, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

0-0-0