शुक्रवार, १० मे, २०१३

आवश्यक सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आश्वासन
दुकाने - व्यवसाय सुरु करुन जनतेची गैरसोय
दूर करा : मुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना आवाहन
मुंबई, दि. 10 : स्थानिक सेवा करासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची बाजू उचलून धरलेली असल्याने आता व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने, व्यवसाय सुरु करुन जनतेची गैरसोय दूर करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. जे व्यापारी दुकाने सुरु करु इच्छितात, त्यांना आवश्यक सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दरम्यान, एलबीटीच्या सुलभीकरणसंदर्भात शासनाला शिफारशी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापनाही आज सरकारने केली आहे.
          राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता अन्य महानगरपालिका क्षेत्रातील जकात कर रद्द करुन त्याऐवजी स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स - एलबीटी) लागू केला आहे. या कराबाबत काही व्यापारी संघटनांनी किरकोळ व्यापारी, जनता यांची दिशाभूल करुन दुकाने-व्यवसाय बेद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. मुंबईमध्ये तर अद्याप हा कर लागू झालेलाच नाही. राज्य विधिमंडळात कायद्यात सुधारणा केल्यानंतरच तो लागु होईल. तरीही विनाकारण या कराचा बागुलबुवा उभा करुन व्यापाऱ्यांनी जनतेला वेठीला धरले आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात व्यापाऱ्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरु करुन जनतेची गैरसोय दूर करणे आणि आपलेही हित साधणे योग्य ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा