मंगळवार, २८ मे, २०१३


गिरजा वाकोद प्रकल्पासाठी 16 कोटी - मुख्यमंत्री
            औरंगाबाद, दि. 28 : राज्यातील काही भागात असलेल्या टंचाई परिस्थितीवर शासनाने विविध उपाययोजना योजले असून या परिस्थितीला धैर्याने तोंड देतांना नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. बाबरा पंचक्रोशीतील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी गिरजा वाकोद प्रकल्पासाठी 16 कोटी रुपये मंजूरीची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
            फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील जनावरांसाठी सुरु केलेल्या चारा छावणीस मुख्यमंत्री श्री. चव्हाण आणि खासदार राहुल गांधी यांनी भेट दिली त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
            यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन , वनमंत्री पतंगराव कदम , महसूलमंत्री  तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार एम. एम. शेख, आमदार डॉ. कल्याण काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यातील टंचाई परिस्थितीत पिण्याचे पाणी जनावरांना चारा आणि मजुरांच्या हाताला काम देण्यात आले असून यापुढेही या बाबीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
            उपस्थित नागरिकांच्या विविध समस्यांना उत्तर देतांना मुख्यमंत्री चव्हाण यांनी परिसरातील 12 कि.मी. खराब रस्त्याचे लवकरात लवकर काम केले जाईल तसेच भविष्यात टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले.
            यावेळी माणिकराव ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बाबरा परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिध, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
**
मुख्यमंत्री चव्हाण, खा. राहुल गांधी यांच्याकडून हर्सूल तलावाची पाहणी
             औरंगाबाद, दि. 28-- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राहुल गांधी यांनी आज  औरंगाबाद जवळील हर्सूल तलावास भेट देऊन लोकसहभागातून होत असलेल्या गाळ उपसा कामाची पाहणी केली.
            त्यांच्यासमवेत पालकमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर मुख्यमंत्री श्री. चव्हाण व श्री. गांधी यांनी हर्सूल येथील साईनाथ राठोड, मनोज राठोड या कुटूंबियांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
                                                                    -*-*-*-*-*-
दुष्काळाच्या मुकाबल्यामध्ये केंद्र सरकारची महत्वाची मदत  - मुख्यमंत्री
            औरंगाबाद, दि. 28 : केंद्र सरकारने जलसंधारण, मग्रोरोहयोसाठी राज्याला मोठया प्रमाणात आर्थिक निधी दिली असून दुष्काळाच्या मुकाबल्यामध्ये केंद्र सरकारची मदत महत्वाची आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे दुष्काळाचा मुकाबला करणाऱ्या जनतेच्या साथीला खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला.
            औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्रीतील  शेवता या ठिकाणी दुष्काळी भागातील रोहयो कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राहुल गांधी आले होते. राज्याचे पुनर्वसन मदतकार्य, वनेमंत्री पतंगराव कदम, महसूल तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात आदी होते.
            मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांची सोय व्हावी यासाठी आतापर्यंत राज्यात 1150 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून यामध्ये साडे नऊ लाख जनावरांना आसरा देण्यात आला आहे. गिरजा वाकोद प्रकल्पासाठी 16 कोटी मंजूर केल्याची घोषणा करतांनाच औरंगाबाद जिल्हयासाठी यापूर्वीच 12 कोटी रुपये देण्यात आले आहे असे ते म्हणाले.
            मग्रारोहयोमधून मोठया प्रमाणावर कामे उपलब्ध करुन देण्यात येत असून केंद्र सरकाचा 90 टक्के निधी यासाठी मिळत आहे. पाहणी करण्यात आलेल्या शेवता-आळंद रस्ता नाबार्डमधून पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
            यावेळी बोलतांना खासदार राहुल गांधी म्हणाले केंद्रातील पंतप्रधान मनमोहनसिंग आणि राज्यातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारे दुष्काळात शक्य ती सगळी मदत देण्यात कटीबध्द आहे. जनतेला " भोजनाचा अधिकार" देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक गरीब व्यक्तीला जेवण मिळेल याची खात्री देण्याचा प्रयत्न आहे. रोजगाराची हमी देणाऱ्या मग्रारोहयोच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येईल.
            मुख्यमंत्री चव्हाण, खासदार गांधी यांनी मग्रारोहयो  अंतर्गत काम सुरु असलेल्या शेवता-आळंद रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याच्या कामांवर 105 महिला व 47 पुरुषांना रोजगार देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
***


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा