सोमवार, १ डिसेंबर, २०१४

गुंतवणुकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची : मुख्यमंत्री
परवानग्यांचे काम फास्टट्रॅकवर आणणार : करंजा बंदर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ
          मुंबई, दि. 1 : ‘मेक इन महाराष्ट्रचे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असुन उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्टट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत आम्ही भागीदाराची भूमिका पार पाडू, असा त्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे  व्यक्त केला.
 रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील जागति दर्जाच्या बहुउद्देशीय पोर्ट टर्मिनल आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्टक्चरच्या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर परिवहन बंदरे विभागाचे  प्रधान सचिव एस.के. शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा. लि. चे अध्यक्ष निखि गांधी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांचीही निमंत्रितांमध्ये उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांच्या भरभराटीसाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणारअसून या प्रकल्पामुळे रोजगाराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. राज्यातील उद्योगांच्या भरभराटीबरोबरच बंदरांच्या सुविधाही आवश्यक आहेत. जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सलेला व येत्या दोन वर्षात पूर्ण होणारा हा प्रकल्प करंजा परिसराचा कायापालट करणार आहे.
शासनाने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी एक -प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. जलद परवानग्यांसाठी  सचिव स्तरिय समिती  स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल आहे. ‘मेक इन महाराष्ट्रचे ध्येय गाठण्यासाठी बंदरे, रेल्वे, रस्ते आदी सर्व क्षेत्रात गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्यात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असून गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.
करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा. लि. चे अध्यक्ष निखि गांधी यांनी शासनाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम आजच प्रकल्पस्थळी सुरु होत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडुन मिळालेले त्वरित सहकार्य आणि वागणूक ही आमच्यासाठी सुखद धक्का होती. आमचा प्रकल्प ज्या भागात होत आहे, त्या करंजा परिसराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहू. दोन वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार शासनाच्या विधायक प्रतिसादामुळे दुणावला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालृक पवन बक्षी यांनी आभार मानले.
०००
रेल्वे प्रवासी तिकीट सुविधा केंद्राचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन
मुंबई, दि. 1 : काळबादेवी येथे यात्री टिकीट सुविधा केंद्राचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. काळबादेवीतील हॅरिसन्स ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार राज पुरोहीत, आमदार ॲड. आशिष शेलार, नगरसेविका श्रीमती वीणा जैन यांच्यासह ट्रॅव्हल्स कंपनीचे पदाधिकारी, स्थानिक नागरीक उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी फित कापून सुविधा केंद्राचे उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे रेल्वे प्रवासाचे प्रातिनिधीक तिकीट बुकींग करुन या सेवेचा शुभारंभ केला. या सुविधा केंद्रामुळे काळबादेवी परिसरातील नागरिकांची सोय झाली असून या ठिकाणी त्यांना रेल्वेचे टिकीट बुकींग, आरक्षण, रद्दीकरण आदी सुविधा प्राप्त होतील.       
०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा