बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

 राष्ट्रीय सुरक्षितेत नुष्य बळ विकासासाठी एनडीएचे मोठे  योगदान - मुख्यमंत्री
पुणे, दि. 28 : राष्ट्राची सुरक्षा आणि विकासाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एन.डी.ए.) मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 123 व्या दीक्षांत समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे कमांडट लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, प्राचार्य ओ.पी.शुक्ला, रिअर डमिरल आनंद अय्यर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, देशाची आजपर्यंतची वाटचाल दोन टप्प्यात झाली आहे. नव्वदच्या दशकापर्यंत देशाची अर्थव्यवस्था बंदीस्त होती. पण त्यानंतर अर्थव्यवस्था खुली झाली. त्यामुळे देश आर्थिक आघडीवर अधिक गतीने विकास करू लागला. पण त्याचबरोबर देशाला अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन आघाड्यांवर आपली सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली आहे. देशाची सुरक्षा चोख ठेवण्याचे कार्य आपले लष्कर करीत आहे. लष्करासाठी अतिशय चांगले अधिकारी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी करीत आली आहे, यापुढेही करीत राहील. प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे याचा राज्य शासनाला विशेष अभिमान आहे. संरक्षण दलासाठी लागणाऱ्या विविध उत्पादनांबाबत नवीन खरेदी धोरण आखले आहे. यामुळे देशातील खासगी उत्पादकांना नवीन संधी निर्माण होतील.
एनडीएमध्ये मिळालेल्या शिक्षणाचा संरक्षण दलाच्या सेवेत तर उपयोग होणारच आहे पण त्याचबरोबर  येथे मिळालेले सेवा, शिस्त, शिक्षण आणि देशप्रेमाची शिकवणीचा जीवनभरात उपयुक्त ठरतील, देशाची सेवा आणि विकास यासाठी कार्यरत राहा, असा संदेशही मुख्यमंत्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आज सुमारे 330 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भोजराज शाक्या याला नेव्हल स्टाफ करंडकाने गौरविण्यात आले. त्याचबरोबर ए.एस. भट्ट, पी. सिंग यांनाही विशेष नैपुण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. लेफ्टनंट जनरल अशोकसिंग यांनी प्रास्ताविक तर रिअर डमिरल आनंद अय्यर यांनी आभार मानले.
000 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा