ज्येष्ठ
नेते एनकेपी साळवे यांच्या निधनाने
निष्ठावंत,
दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले
- मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई,
दि. 1 : ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी. साळवे यांच्या निधनाने एक
निष्ठावंत, दिलखुलास आणि अभ्यासु नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात
श्री. चव्हाण म्हणतात की, स्व. एन. के. पी. साळवे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी
होते. राजकीय क्षेत्रात वावरताना अत्यंत महत्वाचा आणि दुर्मिळ असा निष्ठेचा गुण त्यांच्याकडे
होता. अतिशय अभ्यासु आलेल्या श्री. साळवे यांनी ज्या ज्या पदांवर काम केले, त्याला
त्यांनी पूर्ण न्याय दिला. त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द आणि त्यांनी केलेले
काम इतरांना सतत प्रेरणा देणारे ठरेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष
असताना त्यांनी आपले क्रीडाप्रेम, व्यवस्थापन कौशल्य, सर्जनशीलता यांचे दर्शन
घडविले. त्यांच्या नावाने सुरु झालेली प्रतिष्ठेची चॅलेंजर चषक स्पर्धा क्रिकेट
रसिकांच्या पुर्ण पसंतीला उतरली होती.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा