सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला संदेश


दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात
साजरी करुन पर्यावरणप्रेमी बना
                                - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
                                                                              
      मुंबई दि. 24 ऑक्टोबर :  पर्यावरणाचे संरक्षण हे आपणा सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. एक जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त वातावरणात दिवाळीचा सण साजरा करावा आणि पर्यावरणमित्र बनावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
      दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात "दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, प्रसन्नतेचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाचा संदेश देणारा हा उत्सव आहे.  दीपोत्सव हा केवळ दिवे-पणत्या लावण्यापुरताच मर्यादित नाही. दिवा किंवा पणती हे ज्ञानाचे प्रतीक आहे.  चांगल्या गोष्टींच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात.  आपला आनंद इतरांबरोबर वाटणे आणि इतरांचे दु:ख आपण वाटून घेणे हे दिवाळीच्या सणाद्वारे आपण शिकतो.  सर्व समाजबांधवांसोबत दीपोत्सवाचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. हा सण प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त वातावरणात साजरा करावा असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी ही दीपावली राज्यातील जनतेला सुख-समृध्दीची प्रकाश देणारी ठरावी" अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
----0----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा