शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

पंतप्रधान ग्राम सडक योजनेखाली राज्यात
354 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई, दि. 19 : राज्याच्या विविध भागातील 105 रस्त्यांची कामे आणि 29 पुलांची कामे अशा 354 कोटी रुपयांच्या कामांना पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुरी दिल्याचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री            श्री. जयराम रमेश यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज पत्राद्वारे कळविले आहे.  639 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या या कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत छोटी खेडी आणि वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जातात.  नव्याने मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमुळे 10 जिल्ह्यांतील 30 वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जाणार आहेत.  पंतप्रधान ग्राम सडक योजना-टप्पा 2 मध्ये महाराष्ट्राला 2 हजार 620 कि. मी. चे रस्ते मंजूर केले जाणार आहेत.  यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावेत म्हणजे त्यांना नोव्हेंबर 2013 पर्यंत मंजुरी देणे शक्य होईल असे श्री.रमेश यांनी म्हटले आहे. 
केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी मंजुरी दिलेली कामे खालील प्रमाणे आहेत :-

अ.क्र.
जिल्हा
रस्त्यांची कामे
लांबी (कि. मी.)
किंमत (रु.कोटी)

रस्त्यांची कामे
1
अहमदनगर
21
49
24
2
अमरावती
16
56
22
3
चंद्रपूर
8
82
45
4
जळगाव
6
42
18
5
नांदेड
4
48
16
6
नंदूरबार
7
131
92
7
नाशिक
13
45
25
8
पुणे
16
89
40
9
ठाणे
6
15
8
10
यवतमाळ
8
82
35

पूल
1
अमरावती
1
30 मिटर
0.63
2
भंडारा
8
210 मिटर
6.01
3
गोंदिया
13
430 मिटर
16.95
4
नाशिक
2
86 मिटर
1.55
5
ठाणे
1
24 मिटर
0.38
6
यवतमाळ
4
166 मिटर
3.29

                                                              -----0---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा