सोमवार, २४ जून, २०१३

दि.बा.पाटील यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी
लढणारा लोकनेता हरपला – मुख्यमंत्री
मुंबई, दिनांक 24 जून :  रायगडचे माजी खासदार त्याचप्रमाणे पनवेल-उरणचे माजी आमदार, शेकापचे ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी आयुष्य झिजविणाऱ्या लोकनेत्याची अखेर झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, दिबांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचले. खासदार आणि आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना त्यांनी रायगड जिल्ह्यातील प्रश्न अतिशय धडाडीने मांडले.  विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी आपल्या वक्तृत्वाने विधानसभा गाजविली.  शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर झालेला कुठलाही अन्याय त्यांनी कधीच सहन केला नाही आणि म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून जनतेने गौरविले.  साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगिकार करणाऱ्या या नेत्याने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या लढ्याची निश्चितच नोंद होईल. त्यांच्या निधनाने जनसामान्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.
-----०-----
                     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा