महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग
केंद्रशासित करावा
विधानसभेत एकमताने ठराव संमत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या
प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा असा विधानसभेत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला. या ठरावाला सर्वांनी मान्यता देऊन हा
ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.आपत्कालिन योजनेसाठी सर्व आयुक्तांना आदेश - मुख्यमंत्री
राज्यातील पावसाची गंभीर
स्थिती पाहता आपत्कालिन योजनेसाठी सर्व आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात
आले असून याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तरात सांगितले.
आमदार
श्रीमती मीरा-रेंगे- पाटील व आमदार सिताराम धनदाट यांनी परभणी जिल्ह्यातील कापूस व
सोयाबीन मदत वाटपातील विलंबाबाबतचा प्रश्न विचारला होता.
या
प्रश्नाच्या उत्तरादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी ''हा प्रश्न केवळ एका जिल्ह्यापुरता
मर्यादित नसून राज्यातील जनतेला दिलासा देणाच्या दृष्टीने शासनाने विचार करावा व
भूमिका मांडावी''. तसेच याबाबत आमदारांच्या काही सूचना असतील तर त्यांनी
मुख्यमंत्री कार्यालयाकडे द्याव्यात अशी सूचना केली.
यावर उत्तर देताना
मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली तसेच हे अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व
सदस्यांना अवगत केले जाईल, असे सांगितले.
तर
पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पतंगराव कदम यांनी मदतीसाठीच्या रक्कमेचे अंदाज वाढले
असल्याने ते पुरवणी मागणीत मागितले असून पुरवणी मागणी मंजूर होताच सर्वांना मदत
देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी
आमदार सर्वश्री नाना पटोले, ओमराजे निंबाळकर, कृषिभूषण पाटील यांनी सहभाग घेतला.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा